Ramdas Athawale : चवदार तळे सत्याग्रह हा विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.
 Ramdas Athawale
Ramdas Athawale esakal
Summary

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे तत्कालीन अस्पृश्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी केलेला सत्याग्रह हा संपूर्ण विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम ठरला आहे.

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे. क्रांतिसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा देणा-या महाडच्या चवदार तळे क्रांतिभूमी चा आम्हाला अभिमान आहे, असे प्रितपादन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. महाड चवदार तळे सत्याग्रहानिमीत्त शुभ संदेश पाठवून राज्यातील जनतेला ना. रामदास आठवलेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळे सत्याग्रह केला त्याचबरोबर विषमतेचे प्रितक असलेल्या मनुस्मृतीचे दहनही महाड येथेच केले. त्यामुळे महाड ही क्रांतिभूमी देशभरातील आंबेडकरी जनतेला प्रेरणा देणारे क्रांतिभूमी आहे. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 Ramdas Athawale
Atul Bhatkhalkar : मुंबईतील मराठी टक्का घटवणाऱ्यांची चौकशी करा

रिपब्लीकन पक्षातर्फे महाड चवदार तळे येथे येणा-या आंबेडकरी अनुयायांसाठी पाण्याची, अल्पोहाराची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आल्याची माहिती ना. रामदास आठवलेंनी दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवतावादी चळवळीला समतेच्या चळवळीला प्रेरणा देणारा सत्याग्रह आहे असे ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com