कामगारच नाहीत तर, हॉटेल-रेस्टॉरंट कसे सुरू करणार ?

कामगारच नाहीत तर, हॉटेल-रेस्टॉरंट कसे सुरू करणार ?

मुंबई ः रेस्टॉरंट सुरु करण्यास मंजूरी मिळाली खरी, पण ती आता सुरु कशी करणार हा प्रश्न आहे. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगारच गावाला निघून गेले आहेत. त्यांच्याविना काम कसे सुरु करणार अशी विचारणा होत आहे. 
मुंबईतील पंधरा हजारपैकी सुमारे तीन हजार रेस्टॉरंटमध्ये कर्मचारी मर्यादीत होते. ती सुरु होऊ शकतील, पण जास्त कर्मचारी असलेल्या रेस्टॉरंटना कामगारांची उणीव चांगलीच जाणवेल. मुंबईचा निरोप घेतलेले कामगार परत आल्याशिवाय किंवा नव्याने भरती केल्याशिवाय ती सुरु होऊ शकणार नाहीत असे रेस्टॉरंटचे चालक सांगत आहेत. त्याचबरोबर सध्याची 33 टक्क्याऐवजी 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याची मागणी होत आहे. यातून सावरण्यासाठी किमान 80 टक्के बिझनेस होण्याची आवश्यकता आहे.असे  सांगितले जात आहे.

अनेक मध्यम तसेच छोट्या रेस्टॉरंटना सुरुवातीस कर्मचाऱ्यांचे मानधन देणेही जमणार नाही. भाडे जास्त असलेल्या जागेतील रेस्टॉरंटही सुरु करण्याचा फेरविचार करतील. लहान जागेत असलेल्या रेस्टॉरंटना सुरक्षित अंतराचा नियम पाळणे अवघडच जाणार आहे. अनेक रेस्टॉरंटना 33 टक्केच क्षमतेची मर्यादा कमालीची जाचक वाटत आहे. खर्च भरुन निघणेही अवघड होईल. त्यातच ग्राहकांना जास्त प्रतिक्षा करावी लागल्यास ते पाठ फिरवण्याचीही शक्यता आहे. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठीही खर्च वाढणार आहे. सातत्याने निर्जंतुकीकरण, कर्मचाऱ्यांसाठी मास्क, ग्राहकांची तपासणी यामुळे बजेट कोलमडण्याचीच शक्यता आहे. आता किमान लॉकडाऊनच्या कालावधीतील लायसन्स शुल्क तसेच कर माफ करावेत अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com