

Is This Mumbai Station Turning Into a Death Trap? Shocking Accident Data Revealed
esakal
Mumbai Local Train: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेत ठाणे स्थानक हे अपघात आणि मृत्यूंचे प्रमुख ठिकाण बनले आहे. गेल्या चार वर्षांत येथे सर्वाधिक जीवितहानी नोंदवली गेली असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपुऱ्या गाड्यांच्या फेऱ्या, सततच्या विलंब आणि गर्दीच्या दबावामुळे येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर असलेल्या या स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात, पण अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे.