

Mumbai to Vijaydurg Ro Ro Ferry to Start from March 1
Esakal
शिमग्यानिमित्त तळकोकणात जाणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. फक्त सात तासात समुद्रमार्गे मुंबईतून तळकोकणात पोहोचता येणार आहे. मुंबई ते विजयदूर्ग अशी रो-रो फेरी १ मार्चपासून सुरू होणार आहे. एकूण १६ फेऱ्या नियोजित असल्याची माहिती समोर आलीय. या सेवेचं उद्घाटन १ मार्च रोजी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास स्वत: नितेश राणे करणार आहेत.