Mumbai Traffic JamESakal
मुंबई
Mumbai News: कल्याण पनवेल प्रवासालाही चार तास, गावी निघालेल्या कोकणवासियांचे हाल
Mumbai Traffic Jam: कल्याण ते पनवेल मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवली जात आहे. परिणामी कोकणच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे.
कल्याण : गणेशोत्सवाकरिता कल्याणहून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात हजारो एसटी गाड्या, खासगी बस व इतर वाहने मार्गस्थ होत आहेत. मात्र या वाहनांना कल्याणहून पनवेलला पोहोचायला सकाळच्या वेळीही चार तासांचा अवधी लागत असल्याचे समोर आले आहे.