मुंबई : पर्यटकांना अनुभवता येणार राजाबाई टॉवरची हेरिटेज सफर

मुंबई विद्यापीठ आणि पर्यटन विकास विभागात झाला करार
mumbai rajabai tower
mumbai rajabai towersakal media

मुंबई : दीडशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) राजाबाई टॉवर (Rajabai tower) आणि दीक्षांत सभागृहाची पर्यटकांना (tourist) सफर करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पर्यटन दिवसाच्या (world tourist day) निमित्ताने यासाठी मुंबई विद्यापीठ (Mumbai university) आणि राज्य पर्यटन विकास विभागात करार (agreement) झाला असून पुढील आठवड्यापासून देश विदेशातील पर्यटकांना राजाबाई टॉवरची हेरिटेज सफर करता येणार आहे.

mumbai rajabai tower
महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणासंबंधित वृत्तांकनाबाबत हायकोर्टाचे अंकुश

पर्यटन विभागाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी या करारावर सह्या केल्या आहेत. पर्यटकांना प्रत्येक सुट्टीच्या दिवशी राजाबाई टॉवर आणि दीक्षांत सभागृह पाहायला मिळणार आहे. यासाठी या पर्यटन सफारीला 'हेरिटेज वॉक' असेही नाव दिले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी या पर्यटन सफरीसाठी इंटर्न म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंग टूरिस्ट गाइड असोसिएशन या खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असून देशातील पर्यटकांना 100 तर विदेशी पर्यटकांना 300 रुपये इतकी रक्कम यासाठी मोजावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या हेरिटेज इमारतीच्या सफर संदर्भात राज्य सरकारने विद्यापीठाला या दोन्ही इमारती पर्यटकांसाठी खुल्या कराव्यात असा प्रस्ताव मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाठवला होता. तर त्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनीही मागील अनेक महिन्यापासून मागणी लावून धरली होती. आता हा करार झाल्याने मुंबई विद्यापीठाचे राजाबाई टॉवर आणि दीक्षांत सोहळा पर्यटकांना खुला होणार असून त्याचे स्वागत कोहचाडे यांनी केले आहे.

mumbai rajabai tower
शिवसेना नेते ईडीच्या रडावर; आनंदराव अडसूळ यांना ईडीचा समन्स

राजाबाई टॉवर हे एकुण २८० फूट उंच आहे.वर माथ्यावर जाण्यासाठी २९० पायऱ्या चढून वर जावे लागते. संपूर्ण रचना ही गॉथिक शैलीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राजाबाई हे प्रेमचंद रॉयचंद यांच्या आईचे नाव राजाबाई टॉवर हे इंग्रजी राजवटीत उभारले असले तरी त्यामागे मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांची यांनी मुंबईत सर्वात उंच क्लॉक टॉवर उभारला जावा आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले जावे, अशी इच्छा व्यक्त केली हेाती. त्यासाठी हे टॉवर बांधण्यासाठी १८६९ मध्ये तीन लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या आईचे नाव राजाबाई म्हणून या टॉवरला राजाबाई क्लॉक टॉवर असे नाव दिले गेले हेाते.

राजाबाई टॉवरची १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली. हे टॉवर आणि बाजूला असलेले दिक्षांत सभागृह या दोन्हीसाठी तब्बल दहा वर्षाचा कालावधी लागला. नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये या टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून आणि खास गॉथिक शैलीत हे राजाबाई टॉवर साकारले. त्याची या टॉवरच्या पायात नोंद ही C.T.S BM, AD 1877 असे दोन ठिकाणी पाषाण दगडावर कोरण्यात आली आहे. हीच खूण विद्यापीठाच्या या टॉवरच्या उभारणीची महत्वाची खूण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com