
Mumbai News: वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर लकी जंक्शन येथे पाली जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या २ जलवाहिन्या पैक्की एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक गळती सुरु झाली . यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
मिळालेल्या माहिती नुसार गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा चमू अथक प्रयत्न करत गळती थांबवण्याचे काम करत आहे.