Latest Mumbai News: पवई येथे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलाजवळ १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना मंगळवारी (ता. २१) पहाटे घडली. .त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. त्यानंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे भांडुप, अंधेरी, धारावी आणि वांद्रे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, गळती रोखून दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. .परिणामी भांडुप एस विभागातील गौतमनगर निम्न पातळी, जय भीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल अँड टी परिसर तसेच अंधेरी के पूर्व विभागातील ओम नगर, साहार गाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, एमआयडीसी परिसर तसेच धारावीतील काही परिसर व वांद्रे एच पूर्व बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस येथील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.