

Mumbai water supply cut
ESakal
मुंबई : महापालिकेच्या वतीने अमर महल ते वडाळा, परळ आणि ट्रॉम्बे ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार (ता. ५ मे) सकाळी १० वाजल्यापासून बुधवार (ता. ६ मे) दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३० तास मुंबईतील शहर आणि उपनगरातील सहा विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.