Mumbai: 'स्वच्छ मुंबई...' कागदावरच! मुंबई महापालिकेवर उच्च न्यायायालयाचे ताशेरे

Mumbai Higj Court: रस्त्यावरील कचऱ्याचे साम्म्राज्य पाहता महापालिकेची 'स्वच्छ मुंबई'ची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे म्हणत मुंबई महापालिकेवर उच्च न्यायायालयाने ताशेरे ओढले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यावरील कुठेही, कशाही पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ३१) गंभीर चिंता व्यक्त केली. रस्त्यावरील कचऱ्याचे साम्म्राज्य पाहता 'स्वच्छ मुंबई, हरित मुंबई' या महापालिकेच्या घोषणेचे पालन होते का, असा प्रश्न उपस्थित करून ती निव्वळ कागदावरच राहिल्याचे ताशेरेही न्यायालयाने पालिकेवर ओढले. तसेच मुंबईतील वारसा स्थळांजवळील कचरा सात दिवसांत हटविण्याचे आदेश महापालिकेला दिले. अन्यथा, संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com