
विरार : वसई-विरार महापालिका परिसरात शेकडोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत इमारती धोकादायक झाल्या असून विरारमधील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन आता सक्रीय झाले आहे. पालिकेने अतिधोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या असून, त्यांना प्रतिसाद न देणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. या इमारतींचे पाणी, वीजजोडणी ताेडण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.