

Navi Mumbai Accident
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूरमधील ॲग्रोली गावाजवळ साखळी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका भरधाव कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या धडकेनंतर ती कार पुढे चाललेल्या रिक्षावर जाऊन आदळली. ज्यामुळे एका ५० वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.