नवी मुंबई विमानतळबाधितांचे आंदोलन तीव्र होणार

विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा
विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा

नवी मुंबई : प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोंबडभुजे आणि उलवे गावांचे स्थलांतर होणार नाही, असा पवित्रा विमानतळबाधित ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच जोपर्यंत सिडको सर्व मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत प्रकल्पबाधितांचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा रविवारी (ता. २५) पार पडला. श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना वाघिवली आणि अखिल भारतीय किसान सभेतर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोंबडभुजे येथील नांदाई माता मंदिरात झालेल्या या मेळाव्याला जवळपास अडीच ते तीन हजार प्रकल्पबाधित उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दहा गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे होते. श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रशांत भोईर यांनी सांगितले की, अजूनही सिडको प्रशासनामार्फत अनेक कुटुंबांना भरपाई देण्यात आलेली नाही. प्रकल्पबाधित तरुणांना प्रशिक्षण व नोकरीबाबतही सिडको प्रशासन चालढकल करत आहे. सध्या उलवे व कोंबडभुजेमधील काही कुटुंबे स्थलांतरित होण्याची शिल्लक आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या दोन्ही गावांचे स्थलांतर होणार नाही. सिडको प्रशासनाने प्रकल्पबाधित कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीस आवश्‍यक प्रशिक्षण देऊन रोजगाराचे हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे.

रोजगारासाठी भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे
प्रकल्पबाधित दहा गावांमधील तरुणांना आवश्‍यक प्रशिक्षण देऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे संजय ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com