मुंबई : नवनीत राणांना 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला ही काँग्रेसची चूक झाली, अशी कबुली काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. जशी हवा बदलते तसे ते बदलणारे आहेत. तसेच राज्य सरकारला कोणताही धोका नसून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता फेटाळून लावली आहे. (Balasaheb Thorat Reaction On Navneet Rana)
थोरात म्हणाले की, राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार केला आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, कुणाच्याही घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे चुकीचे असून, हनुमान चालिसा म्हणायची असल्यास मंदिरात जाऊन म्हणावी असा सल्ला त्यांनी राणा यांना दिला. राणा यांना प्रसिद्धी मिळवायची असल्यावनेच अशा प्रकारचं आंदोलन चाललं असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. अशा लोकांना हाताशी घेऊन भाजप हे करतंय ही वस्तूस्थिती असल्याचेही ते म्हणाले.
केवळ आणि केवळ राज्यातील वातावरण खराब व्हावे आणि अशांतता निर्माण व्हावी हाच या मागचा प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले. परंतु, आम्ही अत्यंत भक्कम आहोत, आघाडी म्हणूनदेखील भक्कम असून, मुख्यमंत्र्यांच्या पाठीशीदेखील आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अधिक चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.