मुंबईतील प्रभागांची रचना नव्याने करण्याची गरज; रवी राजा यांची मागणी

मुंबईतील प्रभागांची रचना नव्याने करण्याची गरज; रवी राजा यांची मागणी


मुंबई : मुंबईतील महानगर पालिका नगरसेवक प्रभागांची रचना नव्याने करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. भाजपने 2016 मध्ये प्रभागांची रचना त्यांना पुरक होईल अशा पध्दतीने केली होती. त्यामुळे आता नव्याने रचना करण्याची गरज असल्याचे सांगत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देणार असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रभागांची दर दहा वर्षांनी फेररचना होते.लोकसंख्येच्या आधारावर ही फेररचना केली होती.2017च्या पालिका निवडणुकी पुर्वी ही फेररचना करण्यात आली होती.यात शहर विभागातील प्रभागांची संख्या कमी झाली होती.तर,उपनगरातील प्रभागांची संख्या वाढली होती.ही प्रभाग रचना भाजपने त्यांना पुरक होईल अशा पध्दतीने भाजपच्या सरकारच्या काळात कार्यकाळात करुन घेतली होती.त्यामुळेच त्यांचे मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले.त्यामुळे आता योग्य पध्दतीने प्रभागांची फेररचना करण्याची गरज आहे.असे रवी राजा यांनी सांगितले.त्यासाठी,मुख्यमंत्री आणि महसुलमंत्री यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

The need to redesign the wards in Mumbai Demand of Ravi Raja

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com