मुंबई - मुंबईत दरवर्षी होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नेहमीच जनजिवन विस्कळीत होत असते. महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतु निसर्गासमोर त्या तोकड्या ठरतात. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपाय सुचवला आहे. त्यासंबधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवले आहे.
दरवर्षी मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे, शहरातील जनजीवन ठप्प होत असते. चाकरमान्याचे हाल होतात. त्यात काहीजणांचे जीव देखील गमावावे लागले आहेत. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनची वाहतूकही बंद होते. यावर केद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एक उपाय सुचवला आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व अधिक आहे. मुंबईच्या पाणी समस्येबाबत आपण सर्वोतोपरी मदत करू असेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्यासोबतच मुंबईच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतही त्यांनी या पत्रात उपाययोजना नमुद केल्या असल्याची माहिती मिळतेय. या पत्राची एक प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसनेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनाही पाठविण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.