जिवंत असताना बेड नाही! अन् मेल्यानंतर स्मशानात जागा नाही; मृतदेहांची हेळसांड सुरूच!

जिवंत असताना बेड नाही! अन् मेल्यानंतर स्मशानात जागा नाही; मृतदेहांची हेळसांड सुरूच!


कल्याण : (बातमीदार) 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये ताळमेळ नसल्याने आरोग्य सेवेची बोजवारा उडाला आहे. कल्याण मधील 48 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा रविवार (ता 5 जुलै) रोजी मृत्यू झाला. त्यानंतरही  नरकयातना संपली नाही. पालिकेच्या स्मशानभुमीत कोरोना रुग्णाच्या प्रेताला  जागाच नाही. तब्बल 7 तासाने अंतिम संस्कार करण्यात आले. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून याबाबत पालिका विरोधात प्रहार जन शक्ती पक्ष मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

कल्याण पश्चिम मधील 48 वर्षीय व्यक्ती हा गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील असताना त्याची कोरोना चाचणीसाठी 2 हजार 800 रुपये घेण्यात आले याबाबत संबधित नागरिकांच्या नातेवाईकांनी पालिका अधिकारी वर्गाला संपर्क साधून ही चाचणीचे पैसे कमी झाले नाही किंवा मोफत झाली नाही , एकीकडे शासनाने जाहीर करून ही सवलत मिळत नसेल तर घोषणा का करता असा सवाल केला जात आहे .याबाबत नातेवाईकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .

दोन दिवसांपूर्वी 48 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर त्याला श्वसनाचा त्रास जास्त जाणवू लागल्याने त्याच्या नातेवाईकानी पालिका डॉक्टर आणि शास्त्रीनगर रुग्णालयमध्ये संपर्क साधला आणि समस्या मांडल्या मात्र बेड नसल्याचे सांगण्यात आले .खडकपाडा येथील खासगी रुग्णालयमध्ये व्यवस्था करण्यात आली.  मात्र तेथे 50 हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगताच नातेवाईकाच्या पाया खालची वाळू घसरली.

रुग्णाला त्रास होत होता नातेवाईकानी पुन्हा पालिका डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला आणि कसेबसे त्या रुग्णाला पालिका शास्त्रीनगर रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले .मात्र शास्त्रीनगर मधील आरोग्य विभाग आमच्याकडे व्हेंटीलेटर बेड नाही त्यासाठी आपण कोठे तरी त्याची सोय करा. आम्ही काही करू शकत नाही. खाजगी कॉव्हिड रुग्णालय आम्हाला सहकार्य करत नाही. 
असे त्यांनी सांगितले

48 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा व्हेंटीलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने रविवार ता 5 जुलै रोजी दुर्दवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे  यानंतर ही समस्या संपली नाही. मृत्यूदेह देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून शववाहिनी उपलब्ध होत नव्हती. जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांच्या मदतीने मृतदेह दोन तासाने ताब्यात दिल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कार कल्याण डोंबिवली मधील जवळपास पाच सहा स्मशानभुमीत विद्यूतदाहीनी बंद असल्याच्य कारणावरुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला.

दत्तनगर डोंबिवली स्मशानभुमीत मृतदेह 4 तास ठेवावी लागली . दत्तनगर डोंबिवली स्मशानभुमीत विद्युतीदाहीन बंद असल्याचे कारण सांगितले व कोरोना रुग्णाला लाकडावर अंत्यसंस्कार करण्यास पालिकेने मनाई केल्याचे सांगण्यात आले.  तेव्हा पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे नातेवाईक अण्णा पंडित यांनी समस्या मांडल्यावर आठ आठतासानंतर रात्री दहाच्या दरम्यान अत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य सरकारने गरिबांसाठी विविध योजना जाहीर करून ही कोरोना बाधित रुग्णावर कल्याण डोंबिवली महानगर पालिका रुग्णालय मध्ये उपचार होत नसून पालिका मुख्यालय आणि रुग्णालय यंत्रणा मध्ये ताळमेळ नसल्याने गरिबांचे मरण सोपे झाले असल्याचे वारंवार समोर येत आहे. 

मरणानंतर ही अंत्यसंस्कार होत नाही याबाबत कल्याण डोंबिवली महानगर पालिका विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी दिली . याबाबत पालिका आरोग्य विभाग वेद्यकिय अधिकारी डॉ सुरेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता बोलण्यास नकार दिला .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com