मुंबई : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. सातही धरणांच्या क्षेत्रात मागील २४ तासांत ९० ते १८० मिमी पाऊस झाला. त्यामुळे मोडक सागर, तानसा आणि तुळशी यांच्यापाठोपाठ आता मध्य वैतरणा आणि विहार तलावही भरण्याच्या मार्गावर आहेत.
तलावांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे मुंबईची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्यात जमा आहे.
पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी वाढू लागल्याने मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द झाली. मध्य वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी २८५ मीटर आहे. सध्या २८१ मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तो दोन दिवसांत भरेल, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.
येत्या आठवडाभरात
सर्व तलाव भरणार
विहार तलाव आता जवळपास पूर्ण भरला आहे. भातसा तलाव भरण्यास मात्र वेळ लागेल. पावसाचा जोर पाहता सर्व तलाव आठवडाभरात पूर्ण भरून वाहू लागतील, असा विश्वास जलअभियंता विभागाने व्यक्त केला.
पाणी पातळी (शनिवारपर्यंतची)
तलाव पूर्ण भरण्याची सध्याची
(मीटरमध्ये) (मीटरमध्ये)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.