लोकभावना नसलेलं सरकार उलथवून टाका! 

file photo
file photo

मुंबई : देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी व फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही, त्यामुळे हे सरकार उलथवून टाका, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत अणुशक्तीनगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक व चेंबूरमधून कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

या वेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना पवार म्हणाले, की पाच वर्षांतील भाजपचा कारभार पाहता बदल हवा अशी भावना लोकांनी बनवली आहे. 

परिवर्तनाची गरज आहे, कारण समाजातला असा कोणताही वर्ग नाही, की तो समाधानी आहे. शेतकरी, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापारी सगळे नाखूश आहेत. हाताला काम नसल्याने बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनली आहे, पण या सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 

मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे 70-80 हजार कोटी कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. 

आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्योग उभे केले, पण आज पन्नास टक्के उद्योग बंद पडलेत. जे सुरू आहेत ते कसेबसे सुरू आहेत. कामगार उघड्यावर पडला आहे, पण या सरकारला भावनिक मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या आहेत. हे सरकार लोकांच्या हिताची जपणूक करणारं नाही. म्हणून ते उलथवून टाकायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com