

Mumbai-Ahmedabad Highway
ESakal
मनोर : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्यात भराव आणि काँक्रीटीकरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.