Democracy on Hold in Navi Mumbai: Why 27 Villages Have Announced an Election Boycott
esakal
मुंबई
Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा
Project-Affected Villages Are Boycotting Elections : पनवेल तालुक्यातील २७ गावांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे.
पनवेल तालुक्यातील २७ गावांतील रहिवाशांनी भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका यांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे ग्रामस्थांनी हा कठोर पवित्रा घेतला आहे.

