मुंबईत पोलिस बंदोबस्तात वाढ

मुंबईत पोलिस बंदोबस्तात वाढ

मुंबई: जम्मू-काश्‍मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर संपूर्ण देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईसह संपूर्ण राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरसंदर्भातील कलम ३७० मधील काही अनुच्छेद आणि ३५ ए कलम रद्द केल्याचे एका बाजूला स्वागत केले जात असून, दुसऱ्या बाजूला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात काही समांजकंटक आणि दहशतवादी संघटनांनी घातपाताचा कट आखल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह प्रत्येक राज्यातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. 

शहरात विविध ठिकाणी मुंबई पोलिस व रेल्वे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू असून, वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. 
पोलिसांनी साध्या वेशात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. श्‍वान पथक, बॉम्बनाशक पथकाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. एटीएसने काही संशयितांवर करडी नजर ठेवली आहे. स्थानिक पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवली असून, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास चौकशी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com