विजेच्या खांबांना लाकडाचा आधार

धाेकादायक विजेचे खांब दाखविताना ग्रामस्‍थ
धाेकादायक विजेचे खांब दाखविताना ग्रामस्‍थ

मुंबई  : अलिबाग तालुक्‍यात कुर्डूस परिसरातील सुमारे 15 विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 
कुर्डूसमध्ये सुमारे एक हजार 300 रहिवासी राहतात. येथे सुमारे तीनशेच्या आसपास विद्युत ग्राहक आहेत. या गावात बसविलेले विजेचे खांब 30 ते 40 वर्षांपासून जुने आहेत. अनेक विजेचे खांब गंजले असून वाकलेही आहेत. यातील काही विजेच्या खांबांना लाकडाचा आधार देण्यात आला आहे; तर काही विजेच्या खांबांना घराचा आधार असल्याने धोका टळला आहे. मुसळधार पावसामध्ये हे विजेचे खांब कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता कुर्डूस ग्रामपंचायत सदस्य तुषार शेरमकर यांनी व्यक्त केली. या धोकादायक विजेच्या खांबांबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र अजूनही धोकादायक विजेचे खांब बदलण्यात आलेले नाहीत. 


कुर्डूसमध्ये 35 विजेचे खांब आहेत. यातील 15 विजेच्या खांबांची अवस्था दयनीय आहे. हे विजेचे खांब तातडीने बदलण्याची आवश्‍यकता आहे. कमी क्षमता असलेले रोहित्र बसविल्याने नागरिकांना पुरेसा विजेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे योग्य क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे. 
- तुषार शेरमकर, सदस्य, कुर्डूस ग्रामपंचायत 

कुर्डूसमधील खराब झालेले विजेचे खांब दीनदयाळ योजनेंतर्गत बदलण्यात येणार आहे. चार-पाच दिवसात त्याचे काम सुरू करण्यात येईल. 
- मोतीराम राख, उप-कार्यकारी अभियंता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com