मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.