रिफायनरीला भूमिपुत्रांचा विरोध

रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पदमश्री बैनाडे यांना निवेदन देताना ग्रामस्थ
रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पदमश्री बैनाडे यांना निवेदन देताना ग्रामस्थ

अलिबाग : नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येत आहे. स्थानिकांना विश्‍वासात न घेता राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी रिफायनरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चाळीस गावांतील भूमिपुत्रांनी या प्रकल्पाला जाहीर विरोध दर्शविला आहे. याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना चाळीस गाव संघर्ष समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी चाळीस गाव संघर्ष समितीचे समन्वयक प्रमोद कासकर, गैनिनाथ कटोरे, गणेश भगत, अनंत पाटील, जीवन पाटील, राजा जोशी, राकेश ठाकूर उपस्थित होते. २० जून २०१९ रोजी रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येत आहे, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र स्थानिकांच्या प्रतिक्रिया न घेता, तसेच जनतेला विश्‍वासात न घेता शासनाने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप चाळीस गाव संघर्ष समितीने केला आहे.

रिफायनरी प्रकल्पामुळे नैसर्गिक संपदा नष्ट होईल. त्यात मोठ्या प्रदूषणाला नागरिकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. जर जिल्ह्यात प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावयाची असल्यास या विभागाचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्‍थ जीवन पाटील यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com