

Mumbai Pune Bullet Train
ESakal
भारताच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १७ जून २०२६ रोजी घोषणा केली की, देशाच्या पुढील बुलेट ट्रेन कॉरिडॉर, मुंबई-पुणे मार्गाचे काम २०२७ मध्ये सुरू होईल. या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा प्रकल्प भारत स्वतःच्या क्षमतांचा वापर करून विकसित करणार असून हे तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.