शनिवारपासून पावसाचे पुनरागमन ?

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही पावसाची शक्यता आहे.
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : राज्यात ४ सप्टेंबरपासून (September) पावसाचे (Rain) पुनरागमन होण्याचाअंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या प्रवासाच्या शक्यतेमुळे ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) आणि रायगडमध्येही (Raigad) पावसाची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राहील, असा अंदाजही प्रादेशिक हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाने ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावतीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ४ सप्टेंबर रोजी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai
अजून मंत्र्यांची यादी खूप मोठी आहे';पाहा व्हिडिओ

५ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नगरसह मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजीही जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com