वसईत पाऊस थांबला; हाल सुरू

वसई ः पाऊस थांबल्यानंतरही सखल भागात साचलेले गुडघाभर पाणी.
वसई ः पाऊस थांबल्यानंतरही सखल भागात साचलेले गुडघाभर पाणी.

विरार ः वसई तालुक्‍यात गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता थांबला असला, तरी अजूनही शहरातील अनेक भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल कायम आहेत. त्यातच या भागात वीजही गायब असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. 

वसई-विरारमध्ये वाढलेला पावसाचा जोर सोमवारपासून (ता.5) ओसरला आहे. शहरात अनेक ठिकाणी अजूनही पाण्याचा निचरा झालेला नसल्याने त्याचा परिणाम येथील जनजीवनावर झाला आहे. परिसरातील चुळणे, सनसिटी, देवतलाव, नालासोपारा, एच कॉलनी, दिवाणमान या भागात पाणी साचल्याने त्या ठिकाणी रिक्षाही जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या भागात पाणी भरले असल्याने विजेचाही खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना घरात थांबणे कठीण झाले आहे. 

जोरदार पडलेला पाऊस आणि बेसुमार झालेली बांधकामे यामुळे शहरातील पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नाही. याला सत्ताधारी आणि पालिकेतील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 
जॅक गोम्स, सामाजिक कार्यकर्ते, चुलाणा 

सनसिटी हा भाग होल्डिंग पॉईंट असून त्या ठिकाणचे पाणी जोपर्यत निघत नाही, तोपर्यत चुलाणा भागातील पाणी कमी होणार नाही. आम्ही या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याचप्रमाणे निरी आणि आयआयटीची टीम ही या भागात भरलेल्या पाण्याची स्थिती पाहून गेली असून ते ज्या सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. 
राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, वसई-विरार महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com