Raj Thackeray: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, उद्या रायगडावर...

यंदा राज्याभिषेक सोहळा पाच दिवस चालणार असून उद्या पासूनच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे.
Shivrajyabhishek
ShivrajyabhishekSakal

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा येत्या ६ जून रोजी रायगडावर पार पडणार आहे. या कार्यक्रमाला आजपासूनच सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस ७ जूनपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. तसेच राज्याभिषेक सोहळ्याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. (Raj Thackeray Special Post on Shivrajabhishek Din held on Raigad)

Shivrajyabhishek
Ariha Shah Case: चिमुकल्या अरिहा शहाच्या सुटकेसाठी CM शिंदेंचं महत्वाचं पाऊल; परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलं पत्र

राज ठाकरे म्हणतात...

सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती.

त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो. तर मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. (Latest Marathi News)

Shivrajyabhishek
Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले...

ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल!

बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते. (Latest Marathi News)

Shivrajyabhishek
Ariha Shah Case: चिमुकल्या अरिहा शहाच्या सुटकेसाठी CM शिंदेंचं महत्वाचं पाऊल; परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलं पत्र

हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार? माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. उद्या रायगडावर भेटूच.

आपला

राज ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com