मुंबई : कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडून रक्तदान करण्यास धजावत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं. येत्या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान झालं नाही तर राज्यातील एकूण रक्तसाठ्याबाबत आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे. सदा सरवणकर यांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांना आकर्षित करण्यासाठी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला एक किलो चिकन आणि शाकाहारी असल्यास पनीर दिलं जाईल, असे बोर्ड लावलेत. याच मुद्द्यावरून भाजपच्या राम कदम सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधलाय.
महत्त्वाची बातमी : "होऊन जाऊ देत दुध का दूध, पानी का पानी"; अतुल भातखळकर जयंत पाटलांवर कडाडलेत
— Samadhan Sarvankar (@samadhan234) December 4, 2020
महत्त्वाची बातमी : ST बस धडकली महाकाय सिमेंट मिक्सरला, वाशीत भीषण अपघात
राम कदम यांची टीका :
"मुंबई आणि महाराष्ट्रात रक्ताची कमतरता जाणवतेय यासाठी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. म्हणूनच नेत्यांना लोकांना रक्तदानाला प्रेरित करण्यासाठी चिकन आणि पनीरचं आमिष द्यावं लागलं", असं कदम म्हणालेत.
मुंबई तथा महाराष्ट्र में खुन की किल्लत... सरकार की लापरवाही जिम्मेदार.. और वहीं कारण है राज नेताओ को चिकन और पनीर जैसे चीजों को लोगों को देकर ब्लड डोनेशन के लिए प्रेरित करने की नौबत आई है
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) December 9, 2020
सदा सरवणकर यांचं उत्तर :
यावर सदा सरवणकर यांनी राम कदम यांना सुनावलं आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन होता, त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजीत केली गेली नाहीत. म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. मात्र, "पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार? त्यांची अक्कल तोकडी आहे", असं सरवणकर म्हणालेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.