
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपला देश निरंतर वाटचाल करत आहे. या वाटचालीला गती देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.