रविंद्र चव्हाण साहेब विसरेलत की ते कॅबिनेट मंत्री आहेत - दीपेश म्हात्रे

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा झाला. शहरातील विकास कामावरून पालिका प्रशासनावर झोड उठवली.
ravindra chavan
ravindra chavan sakal
Updated on
Summary

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा झाला. शहरातील विकास कामावरून पालिका प्रशासनावर झोड उठवली.

Summary

डोंबिवली - राज्यात शिंदे फडणवीस सरकार एकत्र चूल मांडत सरकारचा गाडा गुण्यागोविंदाने हाकत आहेत. कल्याण-डोंबिवली मध्ये मात्र रस्ते विकास निधीवरून शिंदे फडणवीस सरकार मधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 470 कोटींचा रस्ते विकास निधी तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी रद्द केला होता. तेव्हा केलेले पाप धुवून काढा असा उपहासात्मक टोला कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी लगावला होता. त्यावर शिंदे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी पलटवार केला असून, चव्हाण साहेब विसरेलत की ते कॅबिनेट मंत्री आहेत. मागील 13 वर्षात त्यांनी विकास कामे रखडवून जे पाप केले ते झाकण्यासाठी आरोप करत आहे असा हल्लाबोल कॅबिनेट मंत्री चव्हाण यांच्यावर केला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा झाला. शहरातील विकास कामावरून पालिका प्रशासनावर झोड उठवली. त्यानंतर डोंबिवलीत रविवारी आयोजित एका खासगी कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राज्यात भाजपाची सत्ता असताना, 472 कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकार मधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली आणि वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला. ज्यांनी कोणी रद्द केला त्यांचीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत पहिल्यांदा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. प्रस्ताव पुन्हा सादर करा असे लिहिलं होत पण त्याला सुद्धा एक महिना झालाय. त्यामुळेच केलेले पात आता धुवून टाका असा उपहासात्मक सल्ला चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला होता. चव्हाण यांच्या त्या विधानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे.

शिंदे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे म्हणाले, चव्हाण साहेब कदाचित विसरले आहेत की ते कॅबिनेट मंत्री झालेत. गेले दोन वर्ष त्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये घालवले. 470 कोटीचा कुठलाही निधी मंजूर झाला नसताना वारंवार सांगायचे की 470 कोटी मंजूर झाले होते ते रद्द केले. 370 कोटी मंजूर झाले ते कोणी सांगत नाही ? माझा त्यांना सवाल आहे की 13 वर्षात त्यांनी डोंबिवलीमध्ये विकास काम रखडवून जे पाप केले आहे ते लपवण्यासाठी कदाचित ते आरोप करत असतील असे म्हात्रे म्हणाले.

डोंबिवलीमध्ये येणारे दोन मुख्य रस्ते मानपाडा रोड आणि घरडा सर्कलने पेंढारकर कॉलेज कडे जाणारा रस्ता. हे दोन महत्त्वाचे रस्ते असून पीडब्ल्यूडी च्या अंर्तगत ते येतात त्यांनी काल बोलताना सांगितले की 72 तासात खड्डे बुजवले पाहिजे. त्यांना मंत्री होऊन तर दीड महिना झाला दीड महिन्यात ते दोन रस्त्यावरील देखील खड्डे बुजू शकले नाही. डोंबिवलीकरांना जरासाही दिलासा देऊ शकले नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे त्यांना लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. आपल्याकडं त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या ते मुख्यमंत्र्यांबरोबर गुवाहाटीला देखील होते. विमानात देखील त्यांच्या बाजूलाच ते बसले होते. त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगायला पाहिजे होतं. आता रस्ते काम निधी तुम्ही करा आम्ही आधीच 370 करोड दिलेले आहेत म्हणून माझं म्हणणं आहे की चव्हाण साहेबांनी आपली पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करणं बंद कराव असा सल्ला देखील म्हात्रे यांनी चव्हाण यांना देऊ केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com