Ravindra Chavan
Ravindra ChavanESakal

Maharashtra Politics: मतदार यादी गोंधळावरून रवींद्र चव्हाणांचा संताप, निवडणूक रद्द करण्याची मागणी; राजकारण पुन्हा तापलं!

Ravindra Chavan On Voter List Fraud: नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार याद्यांतील गोंधळामुळे रवींद्र चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच निवडणूक रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.
Published on

डोंबिवली : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार याद्यांतील गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढत असून यावरून आता राजकारण तापले आहे. ठाकरे बंधूंनी दुबार व तिबार मतदार आणि ‘सावळा गोंधळ’ यावर थेट निवडणूक आयोगाला जाब विचारल्यानंतर, आता सत्ताधारी भाजपनेही या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच स्वतः पुढाकार घेत मतदारयादीतील गैरव्यवहारांवर संताप व्यक्त केल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट जाब विचारत निवडणूक रद्द करा अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com