पालघरमध्ये पावसाने भातशेतात पाणी

पालघर ः गुरुवारी झालेल्या पावसामुळे भिजलेले पीक.
पालघर ः गुरुवारी झालेल्या पावसामुळे भिजलेले पीक.

पालघर ः पालघरमध्ये गुरुवारी (ता.७) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंचनामे सुरू असले, तरी भरपाई कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम किनारपट्टीत ७ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान महाचक्रीवादळाचा तडाखा बसेल व अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला होता. प्रशासनानेही आपत्कालीन व्यवस्था उभारली होती; मात्र वादळाची तीव्रता कमी होऊन वादळी वाऱ्याचा तडाखा बसला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असतानाच काल रात्रभर पालघर तालुक्‍यात मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा शेतात पाणी साचले.

आजही पालघरमध्ये ढगाळ वातावरण होते. पालघर तालुक्‍यात १४ हजार ६८५ हेक्‍टर भाताची लागवड झाली असून एकूण १५ हजार ४१३ शेतकरी संख्या आहे. आतापर्यंत नऊ हजार ५९ नुकसानीचे पंचनामे झाले असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com