Mumbai : राज्यातील सुरक्षा रक्षकांची वेतन वाढीला; सुरक्षा रक्षक वाहन चालक संघटनेकडून विरोध

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली वेतनवाढ अखेर राज्य सरकराने केली
Salary hike of security guards Opposition from Safety Guard Association mumbai
Salary hike of security guards Opposition from Safety Guard Association mumbaisakal

मुंबई : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली वेतनवाढ अखेर राज्य सरकराने केली आहे. परंतु, शासनाने सुरक्षा रक्षकांना दिलेली वेतनवाढ मान्य नसून फक्त वेतनवाढीच्या नावाखाली सुरक्षा रक्षकांचा तोंडाला पाने पुसली आहे. शासनाने जाहीर केलेली वेतनवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक संघटनेकडून करण्यात आली.

महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना वेतनवाढीच्या नावाखाली जी तोंडाला पाने पुसली आहेत ती वेतनवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी व सर्व संघटनांचा विचार विनिमय करून सुधारित वेतनवाढ जाहीर करावी आणि जर आपणास महागाई नुसार वेतनवाढ देता येत नसेल तर, वेतनवाढ करू नयेत.

त्या तुटपुंज्या वेतनावर सुरक्षा रक्षक काम करतील कारण आपणास गोरगरीब सुरक्षा रक्षकांचे काही देणेघेणे नसल्याचे आपण केलेल्या वेतनवाढीच्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. वेतनवाढ तात्काळ रद्द केली नाही तर शासनाला सुरक्षा रक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी कामगार मंत्र्यांची आणि ज्या संघटनांनी वेतनवाढीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

त्यांची असेल सदर वेतनवाढ देऊन सुरक्षा रक्षकांना एकप्रकारे हिणवले आहे. तरी आपण योग्य ती वेतनवाढ दिली नाही व मंजूर केलेली वेतनवाढ रद्दबातल ठरविली नाही तर आपल्या विरोधात समस्त महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक आंदोलन करतील त्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहणार असल्याची माहिती माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक संघटनेचे कार्याध्यक्ष अभिलाष डावरे यांनी दिली आहे.

शासनाने पुर्नविचार करावा

कोरोनापासून आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासली असून त्यात महागाई वाढली मुलांची शिक्षणाची फ्री कशी भरायची व घर भाडे कसे द्यायचे, कुटंब कसे चालवायचे व कुटंबातील आरोग्य खर्च कसा चालवायचा अनेक प्रश्न आम्हाला पडले आहे. आता राज्य सरकराने खूप वर्षानंतर १३७५ रुपये वेतन वाढ केली आहे.

त्यामुळे ह्या वेतन वाढीचा आम्हाला काही फायदा होत नाही. साधरणतः राज्य सरकराने वाढती महागाई लक्षात घेऊन ४ ते ५ हजार रुपये वेतन वाढ करायला पाहिजे. शासनाने सुरक्षा रक्षकांची आर्थिक परिस्थिती बघून जाहीर केली वेतन वाढ रद्द करवीत. सुधारित वेतन वाढ जाहीर करवीत अशी प्रतिक्रिया सकाळला मुंबईतील सुरक्षा रक्षकांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com