कर्जत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता खबदारीचा उपाय म्हणून अन्नधान्य मार्केट तसेच भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत कर्जतमधील काही व्यापाऱ्यांनी डाळी, तेलाच्या किमतीत वाढ केली आहे. काही व्यापारी मालच मिळत नसल्याचे सांगून वाढीव दराने माल विकत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीने लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे भान ठेवून योग्य दरात धान्य विक्री करावी, अशी मागणी पोलीस मित्र संघटनेचे उप जिल्हाध्यक्ष दशरथ मुने यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस पाटील धनाजी मुने यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन दिले. सध्या भाज्यापाल्यांचे दर वाढविल्याने डाळ आणि कडधान्यवर भर दिला जात आहे. मात्र या संधीचा फायदा व्यापारी वर्गाने घेतल्याचे चित्र आहे.
व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून दुकानाबाहेर दराची पाटी लावण्यात यावी, अशी सूचना केली जाईल. तसेच वाढीव दराबाबत त्यांना योग्य सूचना करण्यात येतील. याबाबत पालन न केल्यास कार्यवाही केली जाईल.
- विक्रम देशमुख, तहसीलदार
Sale of pulses at high rates from shopkeepers
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.