Samruddhi Expressway ITMS System
esakal
मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांवर आता कडक नजर ठेवली जाणार आहे. पुढील महिन्यापासून या महामार्गावर ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित होणार असून, पहिल्या टप्प्यात नागपूर ते जालना या सुमारे ३६४ किलोमीटर अंतरावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणे, नियमभंग करणे आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.