ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संजय राऊत यांनी पत्र लिहीलेले आहे. यामुळे त्यांचा मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यावर प्रतिउत्तर देताना, त्यांनी हि टीका केली.
संजय राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही. फाऊंडेशनच्या वैद्यकीय कक्षामार्फत कशाप्रकारे वैद्यकीय सेवा पुरविली जाते आणि कुणाकुणाला मदत केली जाते. त्याची संपुर्ण माहिती त्यांनी ठेवली आहे. त्यांच्या तोंडातून शिव्याशाप देण्याशिवाय दुसरे काही येत नाही.
पण, आमच्या फाऊंडेशनच्या कामाबाबतच्या चांगल्या गोष्टी त्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात लिहिल्या आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. राऊत यांना शिव्या शाप शिवाय दुसरे सुचत नसल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जे जेलमध्ये जाऊन आलेले आहे. तेच पत्र लिहीत आहेत.
तसेच खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात पैसे आले. तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली आहे का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच पत्रके घर मे रहने वाले दुसरे को पत्र लिखा नही करते. असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावला. राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील तपशील मोघम आहे. असे म्हणत आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारामध्ये लपत नाही, असे सांगत काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डॉक्टर म्हणून माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्याच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.