मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून इतर राज्यांच्या वागण्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात स्थानिक भूमीपूत्रांच्या न्याय हक्कांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली होती. तसंच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जातील असं त्यांनी सांगितलं होतं. आता यावरून शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते, पण महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात. मध्यप्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
मध्यप्रदेश सरकारने स्थानिक भूमीपूत्रांना नोकऱ्या देण्याचा कायदा आला पण इतर राज्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. मात्र, महाराष्ट्रात स्थानिक भूमीपूत्रांच्या प्रश्नांना प्राधान्यं दिलं तर इतर राज्यांना राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. ही उचकी आता मध्य प्रदेश सरकारने स्थानिक भूमीपूत्रांसाठी केलेल्या कायद्यावेळी गायब झाली आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
मध्यप्रदेशात स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा कायदा आला, तरी दिल्लीसह देशातील राष्ट्रीय एकात्मतावाल्यांचे मन अद्याप डचमळून कसे आले नाही? महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचा विचार समोर आला, त्या प्रत्येक वेळी एकात्मतेचे सर्वपक्षीय ठेकेदार हे संसदेपासून राज्याराज्यांतील विधानसभेत महाराष्ट्राच्या नावाने ठणाणा करीत उभे राहिले, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे.
shivsena saamana editorial attack on madhya pradesh shivraj singh chauhan decision reservation in jobs
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.