"शिवशाही'च्या अपघातांत 18 टक्के घट! 

"शिवशाही'च्या अपघातांत 18 टक्के घट! 

मुंबई - एसटी महामंडळाच्या "शिवशाही' बसना होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असताना महामंडळाने मात्र त्यात 18 टक्के घट झाल्याचा दावा केला आहे. महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत असल्याचेही महामंडळाचे म्हणणे आहे. 

प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली "शिवशाही' सेवा सुरुवातीला अपघाताच्या दृष्टचक्रात सापडली होती; परंतु दोन महिन्यांत अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. या वर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान अपघाताचे प्रमाण 41 टक्के होते. दोन महिन्यांत त्यात 18 टक्के घट झाली आहे. महामंडळाच्या ताफ्यात 998 शिवशाही बस आहेत. राज्यातील विविध 278 मार्गांवर या बसच्या दोन हजार 130 फेऱ्या होतात. 

अपघात रोखण्यासाठी महामंडळाने तज्ज्ञांची समिती नेमली होती. समितीने सुचवलेल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली, असा महामंडळाचा दावा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com