मृतदेहांची मालिका थांबेना... गेल्या महिन्यात सापडले होते ३ तरूणींचे मृतदेह
नालासोपारा: वसई ताल्युक्यातील समुद्र किनाऱ्यावर महिलांचे मृतदेह मिळण्याची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. मागच्या महिन्यात 3 महिलांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर आज (मंगळवारी) अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह असून अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेत ही आत्महत्या की हत्या याबाबत मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे.
विरार च्या अर्नाळा समुद्र किनार्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास एका 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. याची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, गुन्हे शाखा 03 चे पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेऊन तात्काळ शवविच्छेदन साठी पाठविला आहे. तर मीरा भाईंदर, वसई विरार गुन्हे शाखा 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी पत्रक काडून, या महिलेची ओळख पटली तर संपर्क साधण्याचे अहवान केले आहे.
26 जुलै रोजी भुईगाव समुद्र किनाऱ्यावर एका अनोळखी महिलेची हत्या करून, तिचे मुंडके वेगळे करून फक्त धड एका सुटकेस मध्ये भरून फेकलेला मृतदेह सापडला होता. 12 जुलै रोजी वसई पाचूबंदर येथे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह सापडला होता. 9 जुलै ला वसई पूर्व राजीवली परिसरातील केळीचा पाडा याठिकाणी एका 35 वर्षीय महिलेची, अज्ञात आरोपीने तिच्या घराच्या बाथरूम मध्ये गळा दाबून हत्या केली होती. वसई ताल्युक्यात महिलेच्या हत्या आणि मिळणारे मृतदेह यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.