

Mumbai Local
ESakal
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी आणि प्रवाशांवर पडणारा ताण लक्षात घेता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मार्गावरील सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली. यासोबतच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.