Mumbai Police
sakal
नवी मुंबई : दिवाळी सणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठा, मॉल्स तसेच वर्दळीच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. या काळात पाकीटमारी, साखळी चोरी अशा गुह्यांमध्ये वाढ होत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबतही सुचित केले आहेत.