

BMC
Esakal
विष्णू सोनवणे
मुंबई : राज्य सरकारची अनुदाने, मालमत्ता कर, पाणीपट्टी, शिक्षण अनुदान यापोटी सुमारे १५ हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकबाकी आहे. त्यात दरवर्षी वाढ होत आहे. पालिकेने वारंवार मागणी करूनही राज्य सरकारचे विविध विभाग त्या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत. पालिकेला प्रकल्पांसाठी निधीची कमतरता असल्याने पालिका प्रशासनाची ठेवींवर मदार आहे. थकबाकीची रक्कम मिळाल्यास विविध प्रकल्पांसाठी आणि पायाभूत सुविधा निधी उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे.