राज्याचा केंद्र सरकारला झटका! राज्यात विमानसेवा सुरू करण्याला विरोध...

राज्याचा केंद्र सरकारला झटका! राज्यात विमानसेवा सुरू करण्याला विरोध...


मुंबई: कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे विमानसेवा सुरु करण्याला राज्य सरकारने विरोध केला आहे. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आणि इतर सुविधा देण्याची व्यवस्था या परिस्थितीत करणे शक्य नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विमानसेवा सुरु करण्याला राज्याचा विरोध असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे विमानसेवा प्रत्यक्षात सुरु  होईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काही फायदा होणार नाही. त्यातही सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे. या शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे सरकारची भूमिका पहिल्यांदा मांडली आहे. महाराष्ट्रासोबत पंजाब, छत्तीसगड सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यावर आक्षेप घेतला आहे. केवळ आपातकालीन विमानसेवा आणि कनेक्टिव विमानसेवेला मंजूरी देता येईल असही राज्य सरकारने स्पष्ट केल आहे. 
...
क्वारंटाईन नियमाला बगल
विमान प्रवाशांना 14 दिवसाच्या सक्तीच्या क्वारंटाईन नियमातून सूट देण्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरिदीप सिंह पुरी यांनी केली आहे. मात्र अनेक राज्यांनी ही सुट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इतरांना क्वारंटाईन सक्तीचे असतांना  केवळ विमान प्रवाशांना सूट देणे शक्य नाही. त्यामुळे पंजाब,कर्नाटक आणि केरऴ या राज्यांनी क्वांरटाईनच्या नियमात कुणालाही सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी क्वारंटाईनचे नियम सक्तीने अंमलात आणण्याचे संकेत दिले आहेत.

...... 
राज्यातील विमानतळे रेड झोनमध्ये 
पुणे,मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद  ही चारही महत्वाची विमानतळे रेड झोनमध्ये मोडतात. या शहरात टॅक्सी, ऑटो सेवा सुरु बंद आहे. मुंबई,पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी या शहरात विमान प्रवाशांना दाखल करुन घेणे धोकादायक ठरणार आहे.

राज्याच्या अडचणी 
मुबंईतील बहुतांश टॅक्सी, ओला, उबेर चालक त्यांच्या राज्यात निघून गेले आहे. त्यामूळे विमान प्रवाशांच्या वाहतुकीची, राहण्याची व्यवस्था उभी करणे शक्य होणार नाही.मुबई, पुणे या शहरात अनेक कोरोना रुग्णांना टॅक्सी,रुग्णवाहिका मिळत नाही. या परिस्थितीत विमान प्रवाशांची व्यवस्था करणे योग्य होणार नाही. असं राज्य शासनाचे म्हणणे आहे. डोमेस्टिक विमानसेवा झाल्यास, राज्यात  33 टक्के क्षमतेने दिवसाला 150 विमाने उड्डाण करणार आहे.एवढ्या प्रवाशांची व्यवस्था करुन यंत्रणेवर अधिक ताण वाढवण्याची तयारी राज्य सरकारची नाही. 
...
विमान कंपन्यांमध्ये संभ्रम
राज्य सरकारची भूमिका लक्षात घेता, ‘गो एयर’ने  25 मे किंवा त्यानंतरचं  तिकीट बुकींगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून त्या त्या राज्याच्या मंजूरीनंतर विमानसेवा सुरु करणे योग्य राहील असं विमानसेवा कंपन्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com