मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेला तसं पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून सर्व सामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा विचार केला जातोय. कोरोनाच्या नियमांचा वापर करत ट्रेन्स सुरु करायच्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून रेल्वेला एक पत्र पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती
काय म्हटलंय पत्रात :
कोरोना काळात राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी ट्रेन्स सुरु करण्याबाबत विचार करत आहे. रेल्वे सुरु करताना टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरु करण्यात येतील. त्यासाठी रेल्वेकडून काही टाइमस्लॉट्स रेल्वेला सूचित करण्यात आले आहेत.
सदर पत्र पाठवताना राज्य सरकारकडून रेल्वेला ट्रेन्सची संख्या देखील वाढवण्याची विनंती केली गेली आहे. आता यावर रेल्वेकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणं आहे.
state government writes letter to railways to start local trains for all commuters
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.