'आताच कडक प्रतिबंध घालणे गरजेचे, एका आठवड्याच्या आढाव्यानंतर घेणार निर्णय'

'आताच कडक प्रतिबंध घालणे गरजेचे, एका आठवड्याच्या आढाव्यानंतर घेणार निर्णय'

मुंबई: मुंबईसह राज्यभर गेल्या एका आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्य टास्क फोर्स समितीनेही मांडले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होण्याच्या चर्चेला ऊत आले आहे. मात्र, 
आठवडाभराच्या निरीक्षणानंतर लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेतला जाईल. शिवाय, आताच कडक प्रतिबंध घालणे गरजेचे आहे असे मत कोविड टास्क फोर्स समितीने व्यक्त केले आहे. 

शनिवारी दिवस भर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. धास्तावलेल्या नागरिकांनी इतरांना फोन करून याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. गंभीर वातावरण पसरले असताना याबाबत कोरोना मृत्यू निरीक्षण समिती सदस्यांना विचारले असता सध्या आठवडाभर कोरोनाच्या नोंदीचे निरीक्षण करण्यात येईल. नंतर लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यात पुन्हा कोरोना संख्या दुपटीने वाढत आहे. कामधंद्याला बाहेर पडलेल्या नागरिक यामुळे धास्तावले आहेत. मात्र या वाढत्या रुग्ण वाढीवर राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करणार का असा सवाल सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

याबाबत कोरोना मृत्यू निरीक्षण समिती प्रमुख आणि कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, पुढचा एक आठवडा कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या ट्रेंडवर आठवडाभर निरीक्षण करण्यात येणार आहे. मात्र प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक असून लॉकडाऊन नको असल्यास कोरोना प्रतिबंधाचे प्राथमिक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

State Task Force Committee observed number corona patients increasing last one week Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com