

दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहेत. निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहे. १५ मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान, १२ वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आलीय. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.