शिक्षक भरती आता विद्यार्थी संख्येनुसार

Teacher
Teacher

मुंबई - शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेतील काही निर्बंध शिथिल केले आहेत. यानुसार उच्च माध्यमिक विद्यालयात तुकडीनिहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरली जाणार आहेत. 

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले असून, भरतीची माहिती तपासण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अनुदानित व अंशत: अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित शाळा, अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक भरती सरल संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यता करण्यात येत आहे. शिक्षक भरतीकरिता वित्त विभागाने २०१६ नुसार घातलेले ५० टक्के निर्बंध उठवण्यात आले आहेत. समायोजनानंतरही शिक्षक अतिरिक्त राहिल्यास त्यांच्या संख्येएवढी त्याच गटातील पदे रिक्त ठेवावी लागतील.

नव्या सूचना 
१० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नवी पदे भरू नयेत
२०० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यासच पदे भरावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com