मुंबई - विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनुदान आणि अन्य मागण्यांसाठी काही दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. आपल्या मागण्यांबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी 2 मार्चला मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शिक्षकांच्या मागण्यांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी गुरुवारी (ता. 28) सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी काही दिवसांपासून आझाद मैदानात ठिय्या दिला असला, तरी त्यांना अनुदान देण्यास प्रशासन तयार नाही. काही तरी मार्ग काढू, असे महापालिका आयुक्त सांगतात; तर अतिरिक्त आयुक्त तसे काही घडले नसल्याचे शिक्षकांना म्हणतात. हे शिक्षक 25 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. या शिक्षकांना 10 वर्षांपासून अनुदान द्यायचे झाल्यास 225 कोटी खर्च येईल, परंतु आजपासून अनुदान दिले तरी ते मान्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही रक्कम सुमारे 46 कोटी रुपये होते.
महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली. शिक्षकांनी महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने गंभीरपणे त्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्याची सूचना केली होती; त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला.
"प्रशासन असंवेदनशील'
शिक्षकांचे आंदोलन चिघळत चालल्याने त्यांच्या मागण्यांबाबत आजच निर्णय घ्या, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. प्रशासनाची संवेदनशीलता संपत चालल्याची टीकाही त्यांनी केली.
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.